Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page


हैदराबाद: पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीमच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीत फक्त एकच जागा भरणे आवश्यक असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीस याने म्हटले आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी संघात स्थान मिळवण्याचे जवळजवळ निश्चित असल्याचे कोहलीच्या या वक्तव्यावरून सूचित होत आहे.

ही स्पर्धा एका जागेसाठी आहे आणि मला वाटते की तिन्ही खेळाडूंनी त्यांची जागा जवळपास पक्की केली आहे. ही निकोप स्पर्धा आहे. कोणाची निवड होईल हे पाहणे औत्सु्क्याचे ठरणार आहे, असे कोहलीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.